TV9 Marathi
राज्यातील राजकारणात सध्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे महायुतीतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भाजप मित्रपक्षांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी महायुतीतील समीकरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील मतभेद उघडपणे समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Go to News Site