TV9 Marathi
माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “अशा प्रकारचे घोडेबाजार थांबवायचे असतील तर ही निवडणूक पद्धत बंद करावी किंवा ओपन व्होटिंगची व्यवस्था लागू करावी. यासाठी मी संसदेत विधेयक आणणार आहे. गरज पडल्यास निवडणूक आयोगाकडे आणि न्यायालयातही जाणार आहे.” दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. “माणसं प्रेमाने जिंकता येतात, हे जर समजलं तर कोणत्याही बिलाची गरज भासणार नाही,” असे म्हणत त्यांनी सुळेंच्या मागणीवर अप्रत्यक्ष टीका केली.
Go to News Site