TV9 Marathi
आज ६ जून, शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा होत आहे. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. राज ठाकरे यांनी हा दिवस केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर देशभरात राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्याची मागणी केली आहे. महाराजांनी भारतीयांमध्ये स्वराज्याची आस जागृत करत, परकियांच्या आक्रमणातून हिंद प्रांताला वाचवले, हा दिवस आपल्या वारशाचे स्मरण करण्याचा आहे.
Go to News Site