TV9 Marathi
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, निवडणुकीत घोडेबाजार झाल्याच्या आरोपांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. निवडणुकीत कोणताही घोडेबाजार झाला नसल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत असताना, विरोधकांनी मात्र उमेदवारांना आर्थिक अमिषे आणि दबाव टाकण्यात आल्याचा आरोप केला आहे.
Go to News Site